मुंबई – मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या कबरीवरून वाद सुरू झाला आहे. समाधीच्या सजावटीवर भाजपने प्रश्न उपस्थित केले आहेत. गुन्हेगाराची समाधी का सजवली, असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे. शेकडो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या माणसाच्या कबरीला इतका आदर का दिला जातो? असा प्रश्नही भाजप नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे.
यातच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या वादावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ते म्हणाले,’मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी किती तडजोड केली, याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी बावनकुळे यांनी केली आहे.
ते म्हणाले,’आम्ही कट्टर हिंदूत्ववादी आहोत. आमचे हिंदूत्व कोणीही हिरावू शकत नाही, असे उद्धव ठाकरे वारंवार सांगत असतात. मग त्यांनी ही तडजोड का केली? त्यांनी याविरोधात धनुष्यबाण हातात का घेतला नाही” असा सवाल बावनकुळेंनी केला आहे.
जर याबाबत गृहमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना कळवले असेल तर ते गप्प का बसलेत? उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी कोणती पातळी गाठली? असे अनेक प्रश्न बावनकुळेंनी यावेळी उपस्थित केले आहेत.
कोण आहे याकुब मेमन?
याकूब मेमन हा मुंबईतील ९३ बॉम्बस्फोटांचा दोषी आहे. ज्याला 2015 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर 30 जुलै 2015 रोजी दक्षिण मुंबईतील बडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याकूब हा एकमेव दोषी होता ज्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता त्याच याकुबच्या कबरीचे समाधीत रूपांतर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संगमरवरी दगडापासून बनवलेल्या या कबरीवर एलईडी दिवे लावण्यात आले होते.
साधारणपणे 18 महिन्यांनंतर कबर खोदली जाते, परंतु याकुबची कबर 5 वर्षानंतरही खोदण्यात आली नाही. याकुबच्या कबरीबाबत यापूर्वीही प्रश्न उपस्थित झाले आहेत. याकुबचा चुलत भाऊ मोहम्मद अब्दुल रौफ मेमन याने एलटी मार्ग पोलिसांत तक्रार दाखल केली. याकुब मेमनचे कब्रस्तान विश्वस्तांनी पाच लाख रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे कबरीवर मेमनच्या कुटुंबाचा अधिकार आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे, जर तो नसेल तर मग कबरला व्हीव्हीआयपी ट्रिटमेंट का दिली जात आहे.