गेल्या रविवारी भारतीय महिला संघाला टी २० वर्ल्ड कप मधील अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला…पण अंतिम दोन संघांमध्ये स्थान मिळवणाऱ्या संपूर्ण महिला क्रिकेट संघाचे कौतुक करावे तितके कमीच. पण क्रिकेट सोडलं तर इतर खेळांमध्ये भारतीय महिला खेळाडूंच्या कामगिरी कडे कुणाचेच जास्त लक्ष जात नाही …. बॅडमिंटन, कबड्डी, बुद्धिबळ, athletics इत्यादी खेळांमध्ये भारतीय महिला खेळाडू नक्कीच चांगली कामगिरी करत आहेत.
याच बाबत तुम्हाला काय वाटतं, नेमके काय केले तर इतर खेळां मधील महिला खेळाडूंच्या कामगिरी कडे सगळ्यांचे लक्ष जाईल आणि पुढची पिढी अशा खेळांमध्ये सुद्धा करियर करता येते अशी स्वप्नं पाहिल. दंगल, पंगा, चक दे इंडिया अशा चित्रपटांमुळे त्या त्या वेळी पुरते महिला खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाते. पण पुढे काय ?
या विषयावरील तुमचं परखड मत तुम्ही येत्या शुक्रवार १३ मार्च २०२० पर्यंत आम्हाला पाठवायचे आहे.
शब्द मर्यादा १५० ते ३०० शब्द.
निवडक लेख बोला बिनधास्त या सदरा मध्ये शनिवारी १४ मार्च २०२० रोजी प्रसिद्ध केले जातील.
लेख पाठवण्यासाठी मेल आय डी :
prabhatcollegeconnect2.0@gmail.com