नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोना विषाणू संसर्गित भागात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बिजींग येथील भारतीय दुतावास चीन सरकारशी संपर्क ठेवून आहे, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी ही माहिती दिली.
भारतीय नागरिकांना हलवण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. याबाबत राजनैतिक पातळीवर आमचा बिजिंगचा दूतावास काम करत आहे. त्याबाबतचा तपशील आम्ही देत राहू, असे त्यांनी सांगितले.
मंत्रालयाने नागरिकांसाठ चिोविस तास हेल्पलाईन सुरू केली आहे. या बाबतची माहिती देण्यासाठी 24 तास खुले असणारे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.