अहमदाबाद – येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज, ‘१९४७ ते २०१४ या कालावधीमध्ये भारतीय अर्थव्यवस्था २ ट्रिलियनची डॉलर्स पर्यंतच वाढू शकली मात्र २०१४ ते २०१९ या कालावधीत अर्थव्यवस्थेची वाढ होऊन ती ३ ट्रिलियन डॉलर्सची झाली’ असा दावा केला.
मोदी सरकारच्या बेजबाबदार अर्थ निर्णयांमुळे देशामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढलं असून देशाच्या सकल आर्थिक उत्पन्नात देखील घट झाल्याची टीका विरोधकांकडून केली जात असतानाच गुजरात टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या पदवीदान सोहळ्यामध्ये बोलताना अमित शहा यांनी हा दावा केला आहे.
यावेळी बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी २०२४ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठेल असा विश्वास पुन्हा एकदा व्यक्त केला.
GTU के वार्षिक दीक्षांत समारोह में गृह मंत्री अमित शाह- 1947 से 2014 तक अर्थव्यवस्था 2 ट्रिलियन डॉलर की हुई थी। इसके बाद 2014 से 2019 तक नरेंद्र मोदी सरकार ने इसे बढ़ाकर 3 ट्रिलियन डॉलर तक पहुंचा दिया। भारत 2024 में 5 ट्रिलियन डॉलर का लक्ष्य प्राप्त करने वाला है। pic.twitter.com/PWerGh9Oxz
— ANI_HindiNews (@AHindinews) January 11, 2020