नवी दिल्ली – भारताने आत्मनिर्भर व्हायचे ठरविले आहे. आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानात नावीन्यपूर्ण उत्पादने निर्माण करण्यात भारत आघाडी घेईल असे नॅसकॉम या संस्थेच्या अध्यक्षा देबजानी घोष यांनी म्हटले आहे.
भारतातील तरुण आणि कंपन्या स्वतःच्या जबाबदारीवर या क्षेत्रात काम करीत होत्या. आता केंद्र सरकारने आत्मनिर्भर योजना सुरू केली आहे. भारतातील स्टार्टअप् वाढावे यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याचा फायदा तरुणांनी घेण्याची गरज आहे. सध्या या संदर्भातील काम फक्त मोठ्या शहरांमध्ये चालू आहे. आता हे काम छोट्या शहरातही सुरू होण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.