दुबई – सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांच्या अर्धशतकांनंतर रिषभ पंत आणि हार्दिक पंड्याने केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 211 धावांचे खडतर आव्हान ठेवलं आहे.
प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 2 बाद 210 धावा केल्या आहेत. 2021 च्या टी-20 विश्वचषकात पहिल्यांदाच एखाद्या संघाने 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
भारताकडून रोहित शर्माने 47 चेंडूत सर्वाधिक 74 धावा केल्या. त्याचवेळी केएल राहुलने 48 चेंडूत 69 धावांची खेळी खेळली. शेवटी ऋषभ पंतने केवळ 13 चेंडूत नाबाद 27 धावा केल्या आणि हार्दिक पांड्याने 13 चेंडूत नाबाद 35 धावांची स्फोटक खेळी केली.
अफगाणिस्तानकडून गोलंदाजीत करीम जनत आणि गुलाबदीन नाईब यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात जर भारतीय संघ पराभूत झाला तर त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे भारतासाठी हा सामना करो या मरो, असा असणार आहे.