राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – भारत हा विकसित राष्ट्र मोदींच्या नेतृत्वात पुढे जातोय, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी केले. शिरूर लोकसभा प्रवास योजने अंतर्गत राजगुरूनगर व चाकण येथे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रबंधन समिती व कार्यकर्त्यांची बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख,सुपर वॉरियर्स, सर्व मंडलातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थित बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी पाठक बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय महामंत्री मकरंद देशपांडे, माजी आमदार योगेश टिळेकर, भाजपा उत्तर पुणे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप कंद, राम गावडे, खेड आळंदी विधानसभा प्रमुख अतुल देशमुख, जुन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख आशा बुचके, जयश्री पलांडे प्रिया पवार, डॉ. ताराचंद कराळे, संजय रौंधळ, भगवान शेळके, भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाठक पुढे म्हणाले की, अयोध्या मध्ये प्रभू श्री राम मंदिराच्या 500 वर्षे रखडलेले काम फक्त आणि फक्त केवळ मोदी यांच्या नेतृत्वात पूर्ण होताना आपण पाहतं आहोत, तसेच 2014 नंतर परिवर्तनाची लाट देशात पाहिला मिळते. त्यानंतर देशात भ्रष्टाचार करणार्यांना देशातून उखडून फेकण्यात आले. मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी शिरूर लोकसभेत आपला हक्काचा सदस्य निवडून द्या, अशी विनंती केली.
शरद बुट्टे पाटील यांनी प्रास्ताविकात नमूद केले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत तसेच वित्त आयोगाची योजना दिल्लीपासून गल्लीपर्यंत कशी पोहोचली जाईल, शेतकर्यांना महाडीबीटीच्या माध्यमातून बेनिफिशरच्या माध्यमातून लाभ कसा मिळतो याबाबत सविस्तर माहिती दिली.
देश सुरक्षित राहण्यासाठी आणि विकसित भारत करण्यासाठी शिरूर लोकसभेत उमेदवार कोणीही असो मतदार मोदींना म्हणजेच लोकसभेतील सदस्य मोदींच्या पाठीशी खंबीर उभा राहणारा असला पाहिजे. सबका साथ सबका विकास, अबकी बार चारसो पार. – महेश लांडगे, आमदार, भोसरी