नवी दिल्ली : जपान आणि दक्षिण कोरीयात पसरत असणाऱ्या कोरोना व्हायरसच्या साथीमुळे भारताने दोन्ही देशातून येण्यासाठी जारी केलेल सर्व व्हिसा रद्द केले आहेत. जपानच्या किनाऱ्यावर थांबवलेल्या कोरोनाग्रस्त जहाजातून 119 भारतीय आणि पाच परदेशी व्यक्तींची सुटका केल्यानंतर भारताने हे पाऊल उचलले आहे.
या जहाजावर तीन हजार 711 जण होते. त्यातील 700 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. याशिवाय जपानमध्ये 160 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. चीन पाठोपाठ द. कोरीयात या साथीने आपले हात पाय पसरले असून तेथे दोन हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्या देशांत 13 जणांचे बळी गेले आहेत.
द. कोरीयात पसरलेल्या साथीत नव्याने बाधा झालेल्यांमध्ये 90 टक्के गाईगू शहरातील आहेत. हा त्या देशातील साथीचे केंद्रस्थान आहे, असे एएफपीच्या वृत्तात म्हटले आहे. या शहराच्या शेजारील गिआँगसंग प्रांतातही ही साथ पसरली आहे. भारतात येण्यासाठी जपान आणि द. कोरीयाया नागरिकांना देण्यात आलेले व्हिसा तात्पुरते रद्द करण्यात आले आहेत, असे ट्विट भारतीय दुतावासाने केले आहे.