मुंबई – भारतात यंदा पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेने आतापर्यंत झालेल्या सर्व विश्वकरंडक स्पर्धांच्या अंतिम लढतीत प्रेक्षकसंख्येचा विक्रम मोडीत काढला. यंदा या स्पर्धेचा अंतिम सामना टीव्हीवर तब्बल 30 कोटी प्रेक्षकांनी पाहिला.
यंदाच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचा पराभव झाला व ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले. मात्र, त्यापूर्वी सलग 10 सामने जिंकत भारतीय संघाने थाटात अंतिम फेरी गाठली होती. डिस्ने प्लस हॉटस्टारवरील प्रसारणात सर्व सामन्याने अनेक विक्रम रचले.
त्याच वेळी, टीव्हीवरील प्रेक्षकांचे अनेक विक्रम मोडले आहेत.
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. 30 कोटी क्रिकेट चाहत्यांनी क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना पाहिला. भारतीय टीव्ही इतिहासातील कोणत्याही प्रकारचा हा सर्वात जास्त पाहिला जाणारा सामना ठरला आहे. सर्वाधिक 13 कोटी प्रेक्षकांनी एकाच वेळी हा सामना टीव्हीवर पाहिला.
History rewritten, creating new milestones!
As the dominant #TeamIndia advance to the final in roaring fashion, the Indian fans have made this win truly special. The exciting Semi final match garnered a staggering 5.3 Crore views on @DisneyPlusHS, setting a new benchmark for… https://t.co/87vt57w6xc
— Jay Shah (@JayShah) November 16, 2023
डिजिटलमध्ये ही संख्या 5.9 कोटी होती. हा एक जागतिक विक्रम आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांचे क्रिकेटबद्दलचे प्रेम आणि उत्कटता पाहून आम्ही पुन्हा एकदा भारावून गेलो आहोत. टीम इंडियाला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार, असे या ट्विटमध्ये शहा यांनी म्हटले आहे.