शारजा – विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर 182 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 181 धावा केल्या.
विराट कोहली पुन्हा जुन्या रंगात परतला आहे. त्याने 44 चेंडूत 60 धावा केल्या. विराट कोहलीने आशिया कपमध्ये सलग दुसरे अर्धशतक झळकावले आहे. त्याने 36 चेंडूत टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 32 वे अर्धशतक झळकावले. कोहलीने आपल्या खेळीत चार चौकार आणि एक षटकार लगावला. शेवटच्या षटकात तो बाद झाला. 20 व्या षटकात, हॅरिसने पहिल्या चार चेंडूत दोन धावा दिल्या आणि विराट कोहली धावबाद झाला.
Innings Break!
54-run partnership from the openers and a well made 60 from Virat Kohli propels #TeamIndia to a total of 181/7 on the board.
Scorecard – https://t.co/Yn2xZGTWHT #INDvPAK #AsiaCup2022 pic.twitter.com/0gyWwHHIv1
— BCCI (@BCCI) September 4, 2022
यानंतर रवी बिश्नोई शेवटच्या दोन चेंडूंवर फलंदाजीस आला आणि त्याने सलग दोन चेंडूंत दोन चौकार मारले. फखर जमानचे खराब क्षेत्ररक्षण दोन्ही वेळेस पाहायला मिळाले. शेवटच्या चेंडूवर फखरने बिश्नोईचा सोपा झेल सोडला. अशा प्रकारे भारताने शेवटच्या षटकात 10 धावा केल्या. टीम इंडियाने शेवटच्या पाच षटकात 46 धावा केल्या आणि दोन विकेट गमावल्या.
रोहित शर्मा आणि केएल राहुल प्रत्येकी 28 धावा करून बाद झाले. त्याचवेळी सूर्यकुमार यादवला 13 धावा करता आल्या. दिनेश कार्तिकच्या जागी आलेल्या ऋषभ पंतला 14 धावा करता आल्या.
संक्षिप्त धावफलक – भारत – 20 षटकांत 7 बाद 181 धावा. (विराट कोहली 60, रोहित शर्मा 28, लोकेश राहुल 28, दीपक हुडा 16, ऋषभ पंत 14, सूर्यकुमार यादव 13, रवी बिष्णोई नाबाद 8, शादाब खान 2-31).