IND vs ENG 4th Test Day 3 : रांची येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना खेळला जात आहे.तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव 145 धावांवर संपला. इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या होत्या. त्याचवेळी, भारताचा पहिला डाव आज 307 धावांवर संपला. पहिल्या डावाच्या आधारे इंग्लिश संघाकडे 46 धावांची आघाडी होती. अशा स्थितीत इंग्लिश संघाची एकूण आघाडी 191 धावांची असून भारतासमोर 192 धावांचे लक्ष्य आहे. पण रांचीच्या विकेटवर ज्या पद्धतीने चेंडू फिरत आहे, ते पाहता टीम इंडियासाठी आव्हान सोपे नसेल.
जर टीम इंडिया हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला तर मालिकेत 3-1 अशी अजेय आघाडी मिळवेल. पहिली कसोटी इंग्लंडने तर दुसरी आणि तिसरी कसोटी भारताने जिंकली आहे. | IND vs ENG 4th Test Day 3
दरम्यान, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. विजयासाठी 292 धावांचा पाठलाग करताना भारताने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता 40 धावा केल्या आहेत. सध्या रोहित शर्मा 24 धावांवर नाबाद असून यशस्वी जैस्वाल 16 धावांवर नाबाद आहे. टीम इंडियाला विजयासाठी अजूनही 152 धावांची गरज आहे. | IND vs ENG 4th Test Day 3
इंग्लंङ दुस-या ङावात 145 धावांवर गारद
तत्पूर्वी, तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 145 धावांवर संपला. इंग्लंडकडून दुस-या ङावात सलामीवीर जॅक क्रॉलीने सर्वाधिक 60 धावा केल्या. मात्र बाकीच्या फलंदाजांची साथ त्याला मिळाली नाही. बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, बेन स्टोक्स आणि बेन फोक्स यांसारख्या फलंदाजांनी निराशा केली. इंग्लंडच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला नाही. परिणामी इंग्लिश संघ अवघ्या 145 धावांवर गारद झाला. | IND vs ENG 4th Test Day 3
भारताकडून दुस-या ङावात रवी अश्विन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. रवी अश्विनने इंग्लंडच्या 5 फलंदाजांना आपले बळी बनवले. तर कुलदीप यादवने 4 बळी घेतले. रवींद्र जडेजाने 1 विकेट आपल्या नावावर केली. | IND vs ENG 4th Test Day 3
भारताचा पहिला डाव 307 धावांवर संपला…
भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी 307 धावांवर आटोपला. इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या होत्या. अशा स्थितीत इंग्लंडला दुसऱ्या डावात 46 धावांची आघाडी मिळाली होती. | IND vs ENG 4th Test Day 3
भारताकडून ध्रुव जुरेलने सर्वाधिक धावा केल्या. युवा यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने संघासाठी शानदार खेळी खेळली आणि 149 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 90 धावा केल्या. जुरेलच्या या खेळीने भारताला 300 धावांचा टप्पा ओलांडण्यात महत्त्वाचे योगदान दिले. या व्यतिरिक्त जैस्वालने 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 73 धावा केल्या.
या काळात फिरकीपटू शोएब बशीरने इंग्लंडकडून सर्वाधिक 5 बळी घेतले. याशिवाय टॉम हार्टलेने 3 विकेट्स घेतल्या. उर्वरित दोन यश जेम्स अँडरसनच्या वाट्याला गेले. | IND vs ENG 4th Test Day 3