R Ashwin’s 100th Test special : भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन धर्मशाला येथे भारतासाठी 100 वी कसोटी खेळत आहे, जिथे इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात आहे.
भारतीय संघ धर्मशाला येथे इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळत आहे, ही भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनची 100वी कसोटी आहे.
चेन्नईहून आलेल्या भारतीय फिरकीपटूसाठी 100 व्या कसोटीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अजिबात सोपा नव्हता. त्याने त्यांच्या कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले. भारतासाठी दिग्गज फिरकीपटू होण्यापूर्वी अश्विनने अनेक गोष्टींमध्ये हात आजमावला. अण्णा या नावाने प्रसिद्ध असलेल्या अश्विनकडे अभियांत्रिकीची पदवी आहे, पण तरीही त्याने क्रिकेटला आपलं करिअर बनवले.
फिरकीपटू होण्यापूर्वी अश्विनने फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजीतही हात आजमावला. धर्मशाला कसोटीपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले होते की, अश्विनला करिअरच्या सुरुवातीच्या काळात फलंदाज बनायचे होते आणि तो सलामीला फलंदाजी करत असे.
याशिवाय अश्विनही करिअरच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजी करत असे, परंतु त्याचे बालपणीचे प्रशिक्षक सीके विजय यांनी त्याला ऑफ-स्पिन गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला. प्रशिक्षकाच्या या सल्ल्याने आज भारताकडे अश्विनच्या रूपाने एक अनोखा फिरकी गोलंदाज आहे.
त्याच्या अभियांत्रिकी पदवीबद्दल सांगायचे झाले तर, अश्विनने एसएसएन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून पदवी मिळवली होती. अण्णा (आर. अश्विन) अभ्यासात खूप हुशार होता, पण तरीही त्यांनी क्रिकेटची निवड केली.
अश्विनने 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध दिल्लीत झालेल्या सामन्यातून कसोटी पदार्पण केले होते. आत्तापर्यंत (इंग्लंडविरध्दच्या पाचव्या कसोटीपूर्वी) त्याने 99 कसोटी खेळल्या आहेत, 187 डावात गोलंदाजी करत 23.91 च्या सरासरीने 507 बळी घेतले आहेत.