IND vs AUS Final – भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS Final) यांच्यातील विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stedium) होणार आहे. दोन्ही संघ 20 वर्षांनंतर अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत.
गेल्या वेळी 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला (India Vs Australia) हरवून विजेतेपद पटकावले होते. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये 1.25 लाख प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत. त्याच्याशिवाय अनेक सेलिब्रिटी येण्याची शक्यता आहे. तर काही जण मित्रपरिवारासोबत एकत्र बसून हा हायव्होल्टेज ड्रामा पाहणार आहेत.
उद्या होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. टीम इंडियानं या विश्वचषकात शानदार कामगिरी केली असून, चाहते भारताला विश्वविजेता म्हणून पाहण्यास उत्सुक आहेत.
मात्र, अश्यातच गुजरातच्या राजकोट जिल्ह्याचे भाजपा नेते केयूर ढोलरिया (keur dholariya) यांनी एक मोठी घोषणा केली. ‘वर्ल्ड कप जिंकला तर संघातील प्रत्येक खेळाडूला मिळणार प्लॉट देणार’ असल्याचं केयूर ढोलरिया यांनी म्हंटलं आहे.
ते म्हणाले की, “जर भारतीय संघानं विश्वचषक जिंकला, तर संघातील 15 खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक अशा 16 जणांना भायसर-काथरोट शिवम जेमिन इंडस्ट्रीज झोनमध्ये प्लॉट देण्यात येईल.’ असं केयूर ढोलरिया म्हणाले.