मुंबई: नीधि हस्तांतरणासाठी रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट म्हणजे आरटीजीएस व्यवस्था लोकप्रिय झाली आहे. या यंत्रणेअंतर्गत दोन लाख रुपयांवरील रकमेचे हस्तांतरण केले जाते. मात्र, या व्यवहाराचा कालावधी दुपारी साडेचार वाजेपर्यंत होता. तो आता सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाढविण्यात आला असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. याबाबत उद्योजकाकडून अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला होता. त्या आधारावर बॅंकेने हा निर्णय घेतला असल्याचे समजले जाते.