नवी दिल्ली: भारतात 6 कोटी 50 लाख इतके छोटे दुकानदार आहेत. ई-कॉमर्समुळे या दुकानदारांच्या व्यवहारावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे सर्वांना समान संधी मिळावी अशा प्रकारचे सर्वसमावेशक रिटेल धोरण असावे, अशी मागणी अनेक वेळा सीएआयटी या दुकानदाराच्या संघटनांने सरकारकडे केली आहे. या मागणीवर विचार करून पहिल्या शंभर दिवसांत नवे सरकार, नवे रिटेल धोरण जाहीर करण्याची शक्यता आहे.
अंतर्गत व्यापार आणि उद्योग प्रोत्साहन विभाग हे धोरण तयार करण्यात पुढाकार घेत आहे. भारतातील छोटे उद्योग आणि दुकानदार वाढले तर त्यामुळे केवळ देशातीलच व्यापार वाढणार नाही तर त्यांच्या माध्यमातून निर्यात वाढण्यासही मदत होणार आहे. त्यासाठी चालना देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे विभागाने म्हटले आहे.