सौ. नीलम नरेंद्र काटे यांची यशोगाथा कोणताही राजकीय वारसा नसताना दिपावणारी आहे. आदर्श सरपंचपदापर्यंत त्यांची दमदार कामगिरी आज त्यांच्या कर्तृत्वातून देलवडी गावच्या विकासाच्या माध्यमातून दिसून येत आहे. सहकार, सामाजिक, राजकीय क्षेत्रात काटे कुटुंबाने मोठा ठसा उमटवला आहे. महिला सबलीकरणाचे त्यांचे काम वाखाणण्याजोगे आहे. नीलम काटे यांच्या कार्यपैलूंचा घेतलेला आढावा…
सौ. नीलम यांचे वडील कै. किसनराव जगदेवराव जगताप पोलीस दलात असल्याने त्यांचे प्राथमिक शिक्षण भिगवण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतरचे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण भैरवनाथ विद्यालय भिगवण या ठिकाणी झाले. पुढील शिक्षण त्यांनी इंद्रायणी कॉलेज तळेगाव दाभाडे अकरावी ते एफ वाय बीएपर्यंत शिक्षण पूर्ण केले. 1982 मध्ये त्यांचे लग्न देलवडी येथील तलाठी मुरलीधर नानासाहेब काटे यांचे चिरंजीव नरेंद्र काटे यांच्याशी झाला. काटे यांचा मूळचा व्यवसाय शेती. सासरे हे तलाठी होते. डॉ. मणीभाई देसाई यांच्या सबोत त्यांनी एकत्र कामकाज केले. निवृत्तीनंतर सासऱ्यांचा व्यवसायास नीलम यांनी हातभार लावण्यास सुरुवात केली.
मिरची कांडप, गिरणी, शेवई आदी व्यवसायास त्यांनी हातभार लावला. हा व्यवसाय करीत प्रपंचाचा गाडा त्यांनी ओढत एक यशस्वी गृहिणीची कामगिरी त्यांनी पार पाडली. त्यांना अजिंक्य आणि अभिजीत अशी त्यांची दोन मुले आहेत. दोन्ही मुलांना उच्च शिक्षणापर्यंत पोहोचवण्यासाठी निलम काटे यांनी अथक परिश्रम घेतले. अजिंक्य काटे हे देलवडीचे उपसरपंचपदी विराजमान झाले होते. पती नरेंद्र काटे हे दूध डेअरी, विकास सेवा सोसायटी, ते 15 वर्षे सदस्यपद त्यांनी धुरा सांभाळली. सदस्य असताना नरेंद्र काटे यांचा गावविकासात राजकारण, समाजकारणात मोठा वाटा आहे. काटे कुटुंबाची कोणताही व्यक्ती पहिला राजकारणात नव्हती. राजकीय वारसा नसलेले हे नरेंद्र काटे कुटुंब तालुक्यासह जिल्ह्यातही परिचित आहेत.
नरेंद्र काटे यांना राजकारणासोबत समाजकारणाची आवड असल्याने त्यांनी राजकारणात पाय ठेवला होता. 1984, 1985 मध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी दत्त पाणीपुरवठा सहकारी संस्थेचे संस्थापक चेअरमन म्हणून त्यांनी राजकारणात मुहूर्तमेढ रोवली. 1986 मध्ये त्यांनी पहिली ग्रामपंचायत निवडणूक लढवली. ते सदस्य म्हणून निवडून आले. 1986 पासून सलग तीनवेळा ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आले होते. गणेश सहकारी दूध संस्थेचे संस्थापक म्हणून त्यांनी काम पाहिले. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष, सरचिटणीस, औद्योगिक विभागाच्या तालुका पदावर त्यांनी कामकाज पाहिले.
1988 मध्ये (स्व.) माजी आमदार सुभाषअण्णा कुल यांच्या भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या पॅनलमधून निलम काटे यांनी राजकारणात प्रवेश केला. त्या भीमा पाटसच्या संचालिका म्हणून निवडून आल्या. भीमा पाटसच्या संचालकपदी निवडून आल्याने त्यांनी समाजकारण, राजकारणात पहिले पाऊल ठेवल्यानंतर त्या खऱ्या अर्थाने सक्रिय झाल्या होत्या. त्यापूर्वी त्यांनी उरुळी कांचन येथे महिलांची संस्था स्थापन करून गरीब आणि होतकरू महिलांना जोडून घेतले. त्यांना बचतीचा मार्ग दाखवला. त्या स्वत: हे शेती, प्रपंच, गृह उद्योग सांभाळत आहेत. राजकीय क्षेत्रातून गावाच्या विकासासाठी त्या अग्रक्रमाने पुढे आहेत त्यांनी महिलांसाठी बचत गट, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शिवण क्लासेस, ब्युटी पार्लर क्लासेस, आरोग्य, हिमोग्लोबिन तपासणी शिबिर घेतले. तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले. निलम काटे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिलांसाठी पहिल्यांदाच ओपन जिमची संकल्पना राबवली. सप्टेंबर 2018 मध्ये नीलम काटे यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली. त्यांची बिनविरोध सरपंचपदी निवड गावाच्या विकासाच्या दिशेला नेण्याचे सूचक संकेत होते.
मी राजकारणात आणि समाजकारण करताना मला पावलोपावली माझे सासरे, पती, मुले, ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. माझ्यासोबत माझे सर्व ग्रामपंचायत सदस्य, महिला व तरुणांनी सहकार्य केले. मी त्यांची आभारी आहे.
– नीलम नरेंद्र काटे, देलवडी
सौ. निलम नरेंद्र काटे(सरपंच)
सौ. ताराबाई भानुदास टकले(उपसरपंच)
सौ. मनीषा संजय पडळकर(सदस्या)
श्री. अनिल लक्ष्मण पवार(सदस्य)
श्री. निलेश धोंडिबा भालेराव(सदस्य)
सौ. अविदा सुदाम अडागळे(सदस्या)
सौ. राजश्री महेश शेलार(सदस्या)
श्री. लक्ष्मण तुकाराम जाधव(सदस्य)
सौ. वैशाली दीपक देसाई(सदस्या)
सौ. मंगल राजाराम शेलार(सदस्या)
श्री. बापू लक्ष्मण शेलार(सदस्य)
श्री. अर्जुन ज्ञानदेव वाघोले(सदस्य)
श्री. व्ही. एन. झाडगे (ग्रा.वि. अधिकारी)
श्री. नवनाथ खंडू भालेराव(लेखनिक)
कु. स्वाती सुदाम अडागळे (संगणक चालक)
श्री. अशोक नरेंद्र गायकवाड(शिपाई)
श्री. सुनील बाळासाहेब शेलार (कर्मचारी)
कुटुंबाचे अजातशत्रू हितसंबंध
दौंड तालुक्याचे (स्व.) माजी आमदार सुभाष कुल आणि माजी आमदार रमेशआप्पा थोरात यांच्याशी सासरे मुरलीधर नानासाहेब काटे, पती नरेंद्र काटे यांचे घनिष्ठ संबंध होते. समाजकारणाच्या छंदातून कुल आणि थोरात कुटुंबांशी घनिष्ठ स्नेह संबंध आहेत. स्नेहबंधाचा फायदा काटे कुटुंबांनी गावच्या विकासकामात भर घालण्यासाठी केला. विकासाचा आलेख कसा उंचावला जाईल, याकडे लक्ष दिले आहे. राजकारण व समाजकारण करताना कोणाचेही मन दुखावेल असे राजकारण कधी केले नाही. याची परिपूर्ण काळजी नीलम काटे व कुटुंबाकडून घेतली आहे. दौंडचे आमदार राहुलदादा कुल यांच्या माध्यमातून देलवडी गावच्या परिसरात कोट्यवधींची विकासकामे राबवली आहेत.
शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान
शुद्ध पिण्याच्या पाण्याची योजना केंद्र, राज्य सरकारच्या माध्यमातून होणारे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नाथाचीवाडी येथील माटोबा तलावातून 5 कोटी 91 लाखांची शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम सुरू असून याचे श्रेय आमदार राहुल कुल यांना जाते.
देलवडी गावच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडीत पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर व्यवस्था, जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी शाळांना ई-लर्निंग सुविधा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू केले आहे. विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळांना सोलर सिस्टम बसवले आहे. बोलक्या भिंती इमारतींचे रंगरंगोटीची कामे पूर्ण केली आहेत. ग्रामपंचायत कार्यालयाचे सुशोभीकरण व रंगरंगोटी केली आहे.
लोकसहभागातून आईचे बन
तरुणांच्या आणि ग्रामस्थांच्या संकल्पनेतून आईचे बन उभारले. ही संकल्पना साकारण्यात मोठ्या प्रमाणात तरुण आणि ग्रामस्थांना उपक्रम राबविण्यात यश आले आहे. आईचे बन उपक्रमात देशी वृक्षांची लागवड करण्यासाठी गावातील तरुण, ग्रामस्थांचा मोठा सहभाग आहे. गावातील काही परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या तरुणांचा देखील मोलाचा वाटा आहे.
महामारीत गावहित जपले
जागतिक महामारी करोना कालावधीत देलवडीने शासनाने घातलेल्या बंधनांचे वेळोवेळी पालन केले. करोना काळात गावात विलगीकरण कक्ष उभारले होते. मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले. वेळोवेळी फवारणी व नियमांचे पालन करण्यात आले. महामारीला सामोरे जाण्यासाठी देलवडीकरांना लढा देण्यात यश आले आहे.
एमपीएससीची अभ्यासिका देलवडीमध्ये पहिल्यांदाच तरुणांनी एकत्र येऊन एमपीएससीच्या अभ्यासिका सुरू केली आहे. यामध्ये तरुण रोज अभ्यासासाठी येत आहेत. गावाला अधिकारी कसे मिळतील असा अभ्यास व मार्गदर्शन मिळत आहे. अभ्यासिकेला ग्रामस्थ पुस्तकरूपी मदत करीत आहेत.
विकासकामे
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या जेजुरीचा खंडेराया यांची प्रतिकृती असणाऱ्या गावच्या खंडोबा मंदिराचा लोकवर्गणीतून
जीर्णोद्धार सुरु आहे. रस्त्यांसाठी आमदार राहुलदादा कुल यांच्या प्रयत्नातून परिपूर्ण विकास केला आहे. त्यामध्ये देलवडी वांझरवाडी अडीच कोटींच्या भरीव निधीतून हे काम पूर्ण झाले आहे. देलवडी गावठाणातील रस्ते हे कॉंक्रिटीकरण झाले असून सध्या वाड्या वस्त्यांवरील रस्त्याची कॉंक्रीटची कामे चालू आहेत. आमदार कुल यांच्या माध्यमातून वांझरवाडी अंतर्गत शेलार रस्ता- वाघोली वस्ती, रासाईनगर (बोडकेवस्ती) रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाची कामे सुरू होणार आहेत. खंडोबा मंदिर परिसरात सुशोभीकरणाचे काम सुरू आहे.
गावठाणात बंदिस्त गटार योजना केली आहे. त्याचे 70 टक्के पाणी हे शेतीसाठी वापरले जात आहे. वाडी वस्त्यावरील गटार लाइनची कामे सुरू आहेत. 15व्या वित्त आयोगातील हायमास्ट दिवे बसवले आहेत. स्मशानभूमीत शौचालय, बाथरूमची व्यवस्था केली आहे. इलेक्ट्रिक हायमास्ट दिवे व सौर दिवे बसवले आहे. स्मशानभूमीच्या सुधारणासाठी 15 लाखांची तरतूद केली आहे. निवारा शेड कमानीचे काम करणार आहे. लक्ष्मी माता मंदिराचे काम प्रगतीपथावर आहे. वांझरवाडी येथील खंडोबा मंदिर येथील पेव्हिंग ब्लॉक बसवले आहेत.
दोन समाज मंदिरांची रंगरंगोटी करून सुशोभिकरण केले आहेत. संरक्षक भिंत बांधली आहे.
संकलन : मनोज खंडाळे, (यवत).