मंचर – निराधार महिला, विधवा, परित्यकता, अपंग अशा सर्व कुटुंबांचा अंत्योदय योजनेत समावेश करावा. ग्रामीण भागात प्रत्येक रेशन कार्डधारकांना 2 लिटर रॉकेल उपलब्ध व्हावे, कष्टकरी समुदायाला दिलासा देणारे निर्णय घ्यावेत, अशी मागणी ऍड. नाथा शिंगाडे, अजित अभ्यंकर, किरण मोघे, अमोल वाघमारे, अशोक पेकारी, राजू घोडे, अमोद गरुड, विश्वनाथ निगळे, डॉ. मंगेश मांडवे, जिल्हा सचिव किसान सभा डॉ. अमोल वाघमारे यांनी केली आहे.
प्राधान्य कुटुंबातील सदस्यांनाही साखर मिळावी. अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील सर्वांनाच तांदूळ, गहू, साखर, तेल, डाळ उपलब्ध होणे गरजेचे आहे.