मुंबई – महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमातही भगवद् गीतेवरील धड्यांचा समावेश करावा अशी मागणी भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी आज विधानसभेत केली. भगवद् गीता हे केवळ धार्मिक पुस्तकच नाही तर जीवनाचे सारे सार त्यात आहे असे त्यांनी नमूद केले.
संपूर्ण भारतातील शालेय शिक्षणात याचा समावेश केला जात आहे. महाराष्ट्र शासन शालेय अभ्यासक्रमात ते आणणार का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. गुजरात, कर्नाटक या राज्यांनी तसा निर्णय घेतला आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.
येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात नवीन अभ्यासक्रमांची पुस्तके लागू केली जातील अशी माहिती काल शालेय शिक्षण विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली.