पुणे – हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, उस्मानाबद, लातूर, बीड, जालना, बुलढाणा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, या जिल्ह्यांत पुढील दोन तास (गुरुवार, दि. 19 मे. सायंकाळी 7ते9) वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मध्यम तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, पंढरपूरसह सोलापूरात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. आजच्या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेले नागरिक सुखावले असले तरी शेतकरी वर्गात विशेषत: द्राक्ष बागायतदारांमध्ये वादळी वा-यामुळे चिंता पसरली आहे. दुपारी सोलापूर शहरात मेघगर्जनेसह पाऊस झाला. पुढील चार दिवस पाऊस सुरु राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
दरम्यान, लातूर जिल्ह्यातील हासेगाववाडी येथे अंगावर वीज पडून एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वर अंकुश कांबळे (वय ३५) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आज साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.