Maharashtra Weather| – हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यासह काही भागात गारपिटीनेही तडाखा दिला आहे. विदर्भातील अकोल्यासह बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. यामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. आंबा, लिंबू यासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
अकोला जिल्ह्यातील पातूर तालूक्यातील मळसुर भागात गारपीटीसह जोरदार वादळी पाऊस झाला. सलग अर्धा तास वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मोठा पाऊस झाला. तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार अवकाळी पावसासह गारपीट झालीय. खामगाव तालुक्यातील रोहणा, गानेशापुर परिसरात गारपीट व वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. Maharashtra Weather|
परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मंगळवारी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच सर्वत्र उकाडा प्रचंड वाढला होता. त्यातच सायंकाळच्या सुमारास परभणी, पूर्णा, गंगाखेड, पालम या 4 तालुक्यांसह इतर ठिकाणीही जवळपास अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस बरसला. यामुळे परभणीकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. Maharashtra Weather|
पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या विविध भागात पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. विशेषत मराठवाड्यातील काही जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. त्यानुसार विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, आता काही प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा: