भाजप आमदाराची मागणी
मुंबई – सोमवारपासून सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्ष भाजप विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. अशातच राज्यात भाजप-सेने युतीचे सरकार सत्तेत असताना सुरु करण्यात आलेली जलयुक्त शिवार योजना विद्यमान सरकारने गुंडाळू नये अशी आग्रही मागणी भाजपतर्फे करण्यात आली आहे.
राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महा विकास आघाडीचे सरकार सत्तेत असून महाराष्ट्रात सत्तेत आल्यापासून महा विकास आघाडीच्या सरकारने मागील सरकारचे अनेक निर्णय व योजना मोडीत काढले आहेत. अशातच मागील सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार योजनेलाही महा विकास आघाडीतर्फे रेड सिग्नल मिळण्याची चिन्हं आहेत.
दरम्यान, भाजपचे मराठवाड्यातील आमदार नारायण कुचे यांनी सोमवारी, ‘सरकारने हवं असल्यास जलयुक्त शिवार योजनेला शरद पवार, वा सोनिया गांधी यांचे नाव द्यावे मात्र पाणी प्रश्नावर परिणामकारक ठरत असलेली ही योजना थांबवू नये.’ अशी खोचक मागणी केली.
सरकारमुळे नव्हे तर ‘या’ कारणामुळे ‘जलयुक्त शिवार’ बंद : गडाख यांची माहिती
भाजप-सेना युती सरकारच्या काळात महाराष्ट्रात सुरु करण्यात आलेली जलयुक्त शिवार योजना महाविकास आघाडी सरकार गुंडाळणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी, ‘जलयुक्त शिवार योजनेची मुदत संपली असून राज्य सरकार या योजनसेस वाढीव मुदत देणार नाही’ असं स्पष्ट केलं.
संपूर्ण बातमी वाचा खालील लिंकवर क्लिक करून
सरकारमुळे नव्हे तर ‘या’ कारणामुळे ‘जलयुक्त शिवार’ बंद : गडाख यांची माहिती