न्यूयॉर्क : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध संपताना दिसत नाही. आता दरम्यान, प्रसिद्ध नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाण्या जगाला घाबरवत आहेत. प्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता ‘मायकल डी नॉस्ट्राडेमस’ याने हजारो भाकिते केली आहेत. असे म्हटले जाते की नॉस्ट्राडेमसने आपल्या ‘लेस प्रोफेटीज’ या पुस्तकात 3997 पर्यंत भविष्यवाणी केली होती. आकडेवारीनुसार, त्याचे आतापर्यंत 800 अंदाज खरे ठरले आहेत.
सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाने जग दोन गटात विभागले असून विनाशकारी अणुबॉम्ब हल्ल्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. आंतरराष्ट्रीय संघटना शांततेचे आवाहन करत आहेत, पण परिस्थिती पाहता जगात पसरलेली अशांतता लवकरच शांत होईल, असे वाटत नाही. सगळ्यात मोठी भीती अशीच आहे की, तणाव असाच वाढत राहिला तर तिसरे महायुद्ध सुरू होऊ शकते. बाबा वेंगा यांच्यानंतर नॉस्त्रादेमसचे तिसऱ्या महायुद्धाचे भाकीत लोकांना घाबरवत आहे.
नॉस्ट्राडेमस यांनी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मृत्यूसारखी भविष्यवाणी केली होती, जी खरी ठरली आहे. नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाण्यांवर संशोधन करणाऱ्या लोकांच्या मते, नॉस्ट्राडेमसने शेकडो वर्षांपूर्वी भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्तेवर येण्याचे भाकीत केले होते.
2022 वर्ष संपायला दीड महिना उरला आहे, पण नॉस्ट्राडेमसच्या 2022 च्या भाकितांमुळे लोक भयचकित झाले आहेत. नॉस्ट्राडेमसच्या भाकितानुसार या वर्षी जगात अणुबॉम्बचा स्फोट होईल. असे झाल्यास करोडो लोकांसमोर उपासमारीची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
नॉस्ट्राडेमसने भविष्यवाणीत सांगितले आहे की तिसरे महायुद्ध सात महिने चालेल ज्यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो. नॉस्ट्राडेमसच्या मते या महायुद्धात जगातील अनेक देशांचे अस्तित्व संपुष्टात येईल. या युद्धात जे वाचतील ते नव्याने आयुष्याला सुरुवात करतील.
* बाबा वेंगाचे भारताबाबत भितीदायक भाकीत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाबा वेंगा यांनी भाकीत केले होते की 2022 मध्ये जगात तापमानात घट होईल, त्यामुळे टोळांचा प्रादुर्भाव वाढेल. अन्नाच्या शोधात टोळ भारतावर हल्ला करतील. टोळांच्या हल्ल्यात पिकांचे नुकसान होईल. त्यामुळे भारतात उपासमारीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. बाबा वेंगाची ही भविष्यवाणी खरी ठरली तर देशात मोठा पेच निर्माण होऊ शकतो. याआधीही बाबा वेंगाचे अनेक भाकीत खरे ठरले आहेत, त्यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.