मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालिसाचे पठन करणार आहेत. शुक्रवारी राणा दांपत्य मुंबईत दाखल झाले. दरम्यान मातोश्रीवर मोठ्या संख्येने शिवसैनिक दाखल झाले आहेत. राणा दांपत्य मातोश्रीवर जाण्यााआधी त्यांनी शिवसेना व शिवसैनिकांवर गंभीर आरोप केले आहेत. बाळासाहेबांचे शिवसैनिक असते तर आम्हाला मातोश्रीवर जाऊ दिले असते, बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक उरले नाहीत. रवी राणा व नवणीत राणा मातोश्रीवर जाण्याआधी त्यांनी हे विधान केले आहे.
बाळासाहेबांचे शिवसैनिक असते तर आम्हाला मातोश्रीवर जाऊ दिले असते, बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक उरले नाहीत. मातोश्रीवर जाण्यासाठी आम्ही निघालो असता आम्हाला पोलीसांनी रोखलं असून शिवसैनिकांकडून गुंडगिरी करण्यात येत असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. आम्ही चांगल्या हेतूने हनुमान चालिसा पठन करण पण आमच्यावर हल्याचा प्रयत्न सुरु आहे. आमच्या घरावर हल्ला होत आहे, तरीही मातोश्रीवर जाणार असल्याचा इशारा राणा यांनी दिला आहे.
स्वत: मुख्यमंत्री कायदा व सुव्यवस्था बिघडवत आहेत. मातोश्री हे आमच्यासाठी मंदीर आहे. महाराष्ट्राच्या सुखशांतीसाठी आम्ही मातोश्रीवर जाणार आहे. आम्हाला रोखू नये. आम्ही बाहेर पडणार पुढची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असेल. अुनचित प्रकार घडल्यास राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार असणार असे आरोप करत रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
एकीकडे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत तर दुसरीकडे राणा दांपत्यांनी आम्हाला रोखून दाखवा असा इशारा दिला आहे. मातोश्रीबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले आहेत. दरम्यान राणा दांपत्य मातोश्रीबाहेर जाऊन हुनमान चालिसा पठन करण्यात यशस्वी होणार का? हे आता पहावे लागणार आहे.