नारायणगाव – प्रत्येक मुलात हिरा असतो. त्याला पैलू पाडण्याचे काम विद्यालयातील शिक्षक करत असतात. मला पास व्हायचंय हा ध्यास ठेवला पाहिजे. प्रत्येकाला आपल्यातील गुणवत्ता ओळखता आली पाहिजे. शरीर उत्तम व निरोगी असले पाहिजे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये जिद्द व गुणवत्ता असते, असे विचार माध्यमिक विद्यालय गुंजाळवाडी येथे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेचे सहाय्यक आयुक्त अनिल गुंजाळ यांनी व्यक्त केले. ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे माध्यमिक विद्यालय, गुंजाळवाडी शाळेत शालेय वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून गुंजाळ हे बोलत होते.
या कार्यक्रमप्रसंगी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर, रवींद्र पारगावकर, अरविंद मेहेर, आल्हाद खैरे, शशिकांत वाजगे, रत्नदीप भरविरकर, मुख्याध्यापक एच. पी. नरसुडे, आर. बी. वाघोले, गुंजाळवाडी गावचे माजी सरपंच विकास दरेकर, पोलीस पाटील मंगलदास सोलाट, मुक्तादेवी पतसंस्था अध्यक्ष अंकुश चव्हाण, लता गुंजाळ, पत्रकार अतुल कांकरिया,बाळासाहेब वायकर, राहुल शिंदे, गणेश ढवळे, नामदेव जाधव, सचिन जुंदरे, अनुपमा पाटे, सविता ताजणे, निर्मला नरसुडे, प्रतिभा कदम, कवी सीयाराम कांबळे, सुषमा शिंदे, सुमन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यकर्माचे नियोजन एस. एन. नलावडे, एस. पी. कोकणे, एम. एन. गायकवाड, प्रशांत भुजबळ, ए. पी. पवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक एच. पी. नरसुडे यांनी, सूत्रसंचलन एस. बी. वाव्हळ व ए. बी. कानडे यांनी केले. डी. के. वाबळे यांनी आभार मानले.