मुंबई – राज्यातील सत्तांतरानंतर मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे अशात गेल्या तीन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सातत्याने बैठकांचे सत्र सुरु होते. मात्र खातेवाटपावर मार्ग निघत नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपच्या दिल्लीत बसलेल्या वरिष्ठ नेत्यांच्या समोर याबाबतचा तिढा सुटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात मंत्री मंडळ विस्तारावरून प्रहार संघटनेचे नेते माजी मंत्री बच्चू कडूही विस्तार होत नसल्याने उद्विग्न झाले आहेत. बच्चू कडू यांनी अनेकदा मंत्री मंडळ विस्तार होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती.
अशात आता पुन्हा एकदा माध्यमांशी बोलतांना बच्चू कडू यांनी मंत्री मंडळ विस्तार होत नसल्याचे नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल हे मला माहीत नाही. मी विस्ताराची न्यूज आता पाहत नाही, असा वैताग बच्चू कडू यांनी व्यक्त केला. प्रहारने मंत्रीपदाची मागणी केली आहे. पण मी मंत्रिपद घेणार नाही. राजकुमारसाठी मंत्रिपद ठेवणार आहे. बच्चू कडू यांनी सांगितलं.