कोलकाता – इंडिया म्हणजेच भारत आहे, असे ठासून सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशाला फक्त भारत म्हणावे असा निर्णय अचानक कसा घेतला गेला असा सवाल उपस्थित केला आहे.
आज येथे बोलताना त्या म्हणाल्या की, मी ऐकले की भारताचे नाव बदलले जात आहे. माननीय राष्ट्रपतींच्या नावाने निघालेल्या निमंत्रणावर भारत लिहिले आहे. आम्ही देशाला भारत म्हणतो, यात नवीन काय आहे? इंग्रजीत, आम्ही इंडिया म्हणतो.यात नवीन काही नाही. जग आपल्याला इंडिया म्हणून ओळखते. अचानक असे काय झाले की देशाचे नाव बदलावे लागले? असा सवाल त्यांनी येथे एका कार्यक्रमात बोलताना केला. देशात इतिहास पुन्हा लिहिला जात आहे,असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा – हिंदुस्थानचे नाव “भारत” आणि “इंडिया” कसे पडले? तुम्हला माहित आहे का? जाणून घ्या इतिहास…
यावेळी ममतांनी यांनी राज्यपाल सीव्ही आनंदा बोस यांच्यावरही हल्ला चढवला. राज्यपाल राज्य विधानसभेने मंजूर केलेली विधेयके रोखत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यपालांची कृती म्हणजे राज्य प्रशासनाला पंगू करण्याचा प्रयत्न आहे. ते वित्त बिले रोखू शकत नाहीत,असे त्या म्हणाल्या.
अशीच कुचंबणा होत राहिली तर मी राजभवनाबाहेर धरणे धरेन,असा इशाराहीं त्यांनी दिला. राज्यातील शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या कामकाजात राज्यपाल हस्तक्षेप करत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. राज्यपाल वद्यापीठांच्या कामकाजात ढवळाढवळ करत राहिल्यास आम्ही निधी रोखू,असा खणखणीत इशाराहीं त्यांनी दिला.
हेही वाचा – देशाचे नाव कोणीही बदलू शकत नाही; शरद पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल