मंचर -कळंब (ता. आंबेगाव) येथे अखिल भारतीय सानेगुरुजी कथा माला यांच्या वतीने करोना आपत्ती काळात काम करणाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला, अशी माहिती पुणे जिल्हा समिती ग्रामीणचे अध्यक्ष बाळासाहेब कानडे यांनी दिली.
करोनाआपत्ती काळात निराधारांना अन्नदान नियोजन करणारे मल्हार प्रतिष्ठान मंचरचे कल्पेश बाणखेले आणि अमोल क्षीरसागर यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.करोना आपत्तीच्या काळात कथामाला कार्यकर्त्यांनीही माणुसकी जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी तर गरजू कुटुंबांना किराणा साहित्य देऊन हातभार लावला असल्याचे प्रतिपादन कथामाला बाळासाहेब कानडे यांनी केले.
यावेळी मुख्याध्यापिका मनीषा कानडे, सुमित्रा कामटकर, संतोष कानडे, किरण ननवरे, समीक्षा कानडे, संतोष थोरात,अमृता कानडे उपस्थित होते. प्रास्ताविक चांगदेव पडवळ, सूत्रसंचालन तेजस जाधव, तर सम्राट कानडे यांनी आभार मानले.