नवी दिल्ली – जर सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) स्वातंत्र्याच्या वेळी देशाचे गृहमंत्री नसते तर आज आम्ही येथे उभे राहिलो नसतो; किंवा हा भारताचा नकाशा वेगळाच दिसला असता, अशा शब्दांत केंद्रिय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah ) यांनी पटेल यांना आदरांजली अर्पण केली. मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये शहा एका कार्यक्रमात बोलत होते.
31 ऑक्टोबर ही देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल (Vallabhbhai Patel) यांची 148 वी जयंती आहे. यानिमित्त केंद्र सरकार देशात ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. अशा परिस्थितीत देशाचे गृहमंत्री अमित शहा (Home Minister) यांनी आज सकाळी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये युनिटी रनचा शुभारंभ केला. यादरम्यान त्यांनी जनतेला संबोधितच केले आणि राष्ट्रीय एकतेची शपथही घेतली. भारत जगात आघाडीवर राहील, अशी प्रतिज्ञा प्रत्येकाने घ्यावी, असे त्यांनी जनतेला सांगितले.
शहा म्हणाले की, स्वातंत्र्यावेळी इंग्रजांनी या देशाचे तुकडे केले. सरदार पटेल नसते तर आजचा हा दिवस दिसला नसता. जेव्हा भारत देश स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करेल, तेव्हा भारत संपूर्ण जगात सर्वोच्च स्थानी असेल, अशी प्रतिज्ञा आपण घेतली पाहिजे.
अमित शहा यांनी असेही सांगितले की, मी शपथ घेतो की, देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी मी स्वत:ला झोकून देईन आणि या विचारांचा देशवासीयांमध्ये प्रसार करण्याचे काम करेन. मी सरदार पटेल यांच्या नावाने ही शपथ घेत आहे. मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याची शपथ घेतो.