मुंबई – महाराष्ट्र सरकारने नियम आखून परवानगी दिली स्वागत… अन् नाही दिली तरी आम्ही श्री कृष्ण जन्माचा सोहळा दहीहंडी करणारच . हिंदू धर्माचे सण आम्ही साजरे करणारच . स्वतः घरात बसुन हिंदूनी काय करावे अन करू नये या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.
महाराष्ट्र सरकार ने नियम आखून परवानगी दिली स्वागत… अन नाही दिली तरी आम्ही श्री कृष्ण जन्माचा सोहळा #दहीहंडी करणारच . हिंदू धर्माचे सण आम्ही साजरे करणारच . स्वतः घरात बसुन हिंदूनी काय करावे अन करू नये या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) August 28, 2021
करोना विषाणूचे संकट अद्याप टळले नसल्याने राज्यात दहीहंडी उत्सवाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजपनेते राम कदम यांनी ठाकरे सरकारवर यापूर्वी कडाडून टीका केली आहे.
ते म्हणाले होते की, काहीतरी नियम घालून द्या, पण उत्सव सरसकट रद्द करु नका, असं राम कदम यांनी म्हटलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आम्हाला नियमांबद्दल काहीच म्हणायचं नाही. आम्ही नियम पाळायला तयार आहोत. मात्र प्रत्येकवेळी संयमाची सबुरीची भाषा हिंदू बांधवांनाच का सांगायची ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
दहीहंडी व गणेशोत्सवासाठी गेल्या वर्षीचीच नियमावली कायम…
हे आहेत नियम…
मूर्तीस्थापना मंदिरातच व्हावी.
मंडप “नियमातच उभारावा.
विसर्जन मिरवणुकीस परवानगी नाही.
भपकेबाज करणाऱ्यांवर कारवाई.
सोशल डिस्टंसिंग पालन करावे.
मंडपात गर्दी टाळावी.
धार्मिक कार्यक्रमांना संख्या बंधनकारक.
स्पीकर, डीजेला परवानगी नाही.