बॉलीवूडमधील आघाडीची गायिका नेहा कक्करने नुकतेच पंजाबी गायक रोहनप्रीत सिंहसोबत विवाह केला आहे. यापूर्वी ती अभिनेता हिमांश कोहलीबरोबर रिलेशनशिपमध्ये होती.
या दोघांमध्ये काही वर्षांपूर्वी ब्रेकअप झाला होता. यानंतर हिमांश त्याच्या आणि नेहाच्या नात्याबद्दल बऱ्याचदा व्यक्तझाला आहे. आता नुकताच एका मुलाखतीत हिमांशने पुन्हा त्याच्या ब्रेकअपबद्दल खुलासा केला आहे.
हिमांश म्हणतो, माझ्या ब्रेकअपबद्दल जगाला गोष्टी एक्सप्लेन करण्याची मला गरज वाटत नाही. मी वाईट नाही. तसेच मला नेहालाही दोष द्यायचा नाही.
ती या गोष्टीतून बाहेर पडून आयुष्य जगत असून ती आनंदीही आहे. मीही मला जसे जगावे वाटत आहे, तसं जगत आहे. मात्र काही लोक अजूनही 2018 मध्येच आहेत. ते त्यातून बाहेर पडलेले नाहीत.
मला वाटते की, मी जर काही वाईट केले असते, तर मी सुखाने झोपू शकलो नसतो. ब्रेकअप झाल्यानंतर नेहाला वाटले ते तिने केले.
कारण त्यावेळी ती निराश होती, रागात आणि तणावात होती. त्यामुळे तिने सोशल मीडियावर आमच्या नात्याविषयी बरंच काही पोस्ट केले.
मात्र, जे लोक एखाद्या व्यक्तीसोबत नातं संपल्यानंतर चांगलं-वाईट बोलतात, त्यांच्यासाठी हा खूप मोठा धडा आहे, असेही हिमांश म्हणाला.