नवी दिल्ली :- भारताची अग्रेसर महिला धावपटू हिमा दास हिला राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समितीने (नाडा) तात्पुरते निलंबित केले आहे. नाडाच्या ठावठिकाणा या अटींची तीने पूर्तता केली नसून तीच्याकडून ही चुक एका वर्षात तिनवेळा घडली आहे, म्हणूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे नाडाने म्हटले आहे.
हिमाने दुखापतीच्या कारणाने या महिन्याच्या अखेरीस चीनमध्ये सुरु होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली होती. तसेच ती पुढील वर्षी पॅरिसला होत असलेल्या ऑलिम्पिकचीही तयारी करण्यावर भर देण्यासाठी लवकरात लवकर तंदुरुस्त होण्यासाठी मेहनत घेत होती. नाडाच्या निलंबनामुळे आता तीच्या ऑलिम्पिक सहभागीावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आता नाडाच्या समितीने तीला कारणे दाखवा नोटीस बजावली असून कठोर शिक्षा दिल्यास तीला दोन वर्षे बंदीचा सामना करावा लागू शकतो. मात्र, तीने दिलेले उत्तर समाधानकारक असल्याचे सिद्ध झाले तर या बंदीचा कालावधी एक वर्षापर्यंत कमी होऊ शकतो. मात्र, त्यापूर्वी तीच्याकडून घडलेली चुक कीती गंभीर आहे हे ठरवण्याचा अधिकारही नाडाकडेच आहे.
हिमाने 2028 साली जकार्तात झालेल्या आशियाई स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत रजतपदक मिळवले होते. तसेच याच स्पर्धेत तीने 4 बाय 400 मिटर वैयक्तीक व रीलेमध्ये शर्यतीतही अनुक्रमे सुवर्ण व रजतपदकांची कमाई केली होती. तेव्हापासूनच ती जागतिक ऍथलेटिक्समध्ये नावारुपाला आली.
नाडाच्या तसेच जागतिक उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समितीच्या (वाडा) नियमानूसार प्रत्येक खेळाडूला नियमांतर्गत असलेल्या ठावठीकाणा सांगणे बंधनकारक असते. हिमाने संपूर्ण वर्षभरात नाडा व वाडाला कधीही याबाबत सुचित केलेले नाही, त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे.