नवी दिल्ली : कोरोनाची बाधा अद्याप सामहिक संसर्गाच्या पातळीवर पोहोचली नाही असे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले. या परिस्थीतीला सामोरे जाण्यासाठी सरकार उत्तम स्रोतांचा वापर करत आहे, असे त्यांनी सांगितले. याबाबत होणाऱ्या संशोधनात घडणाऱ्या सर्व घटनांची आम्ही माहिती घेत आहोत.
देशात कोरोना बधीतांच्या संख्येने 190चा आकडा ओलांडला आहे. तर किमान चार जण मरण पावले आहेत. कोरोनाची चाचण किोणाची कारायची याबाबत पुरेशा स्पष्ट मार्गदर्शक सुचना आणि आचार संहिता आहेत. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्याचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाची बाधा सामुहिक संसंर्गाच्या पातळीवर गेली नाही, असे ते म्हणाले. लोकसभेत ते प्रश्नोत्तराच्या तासाला बोलत होते.
आपण डब्ल्यूएचओच्या संपर्कात आहात का असे विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले, आम्ही जगभरतीाल संशोधकांच्या संपर्कात आहोत. आयसीएमआरही याबाबत संपर्क साधून आहोत.