नवी दिल्ली – सध्या अयोध्यानगरी रामनामाच्या भक्तिसागरात तल्लीन झाली आहे. अयोध्येत येत्या 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे. यासाठी अयोध्येत सर्वत्र मोठ्या प्रमाणात जोरदार तयारी सुरु आहे.
भूमिपूजनानिमित्त सर्व २०० अतिमहत्वाच्या व्यक्तींना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. हा सोहळा संस्मरणीय बनवण्यासाठी मान्यवरांना एक खास चांदीचे नाणे भेट देण्यात येणार आहे. या नाण्याच्या एका बाजूला राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान असणार आहेत. तर दुसऱ्या बाजूस तीर्थ क्षेत्रचा प्रतीक चिन्ह आहे.
बुधवारी प्रथमत: रामलल्लाला हिरवे कपडे परिधान केले जातील. त्यानंतर भगवे कपडे घालतील. या विशेष कपड्यांसाठी नऊ रत्ने सोन्याच्या धाग्याने लावण्यात आली आहेत. रविवारी शिंप्याकडून हे वेश देण्यात आले आहेत, असे आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले.
दरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते 12 वाजून 15 मिनिट आणि 15 सेकंदांनी 32 सेकंद वेळात पहिली वीट रचली जाईल. ही वीट 35 ते 40 किलो वजनाची असून ती चांदीची बनवली आहे.