नगर – जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम हंगामामध्ये पेरणी केलेल्या हरभरा पिकाला वातावरणातील बदलामुळे मर लागत असल्यामुळे पिके धोक्यात आले आहेत. परिणामी शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने कांद्या सारखे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातच परतीच्या पावसाने रब्बी हंगामातील पीक मोठ्या प्रमाणात हाताला लागेल या आशेने उसनवारी करून पेरणी केले. मात्र मागील काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामामध्ये पेरणी केलेल्या हरभरा पिकावर मर पडत असल्याने पिके मना फेकू लागली आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिकांनी माना टाकत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
परिणामी रब्बी हंगामात हरभरा पिके हातातून जाण्याची भीती निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे परिणामी हरभरा पिकावर फवारणी करण्यासाठी पैसा कोठून आणावा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे हरभरा पीक हातातून गेल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
फवारणीसाठी आर्थिक अडचण
रब्बी हंगामातील पिकांचे परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यातच रब्बी हंगामातील हरभऱ्याचे पिकाला मर लागत असल्याने माना खाली टाकत आहेत. परिणामी फवारणीसाठी पैसा कोठून आणावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.