नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात पाकिस्तानमधून आपल्या प्रेमासाठी आलेल्या सीमा हैदरच्या प्रकरणाने चर्चा रंगली आहे. मात्र सुरुवातीला प्रेमासाठी देश सोडून आलेल्या सीमाविषयी सर्वाना कुतूहल वाटले परंतु आता सीमाचे पाकिस्तानी सैन्य आणि तिथल्या गुप्तहेर संघटनांशी संबंध असल्याचा संशय बळावत चालला आहे.
नुकतीच तिची तिची एटीएसकडून १२ तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी देखील करण्यात आली होती. मात्र आता या प्रेमप्रकरणाला वेगळे वळण मिळत आहे कारण सीमा हैदरचे नाव घेत देशात पुन्हा २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
मुंबईवर पुन्हा एकदा २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करण्याच्या धमकीचा संदेश मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाकडे आला. या धमकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. सध्या तिच्या बद्दल अनेक नवीन खुलासे होताना दिसत आहेत. अश्यातच एक महत्वाची बातमी समोर आली असून, त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार, सीमा हैदर हिने अत्यंत काळजीपूर्वक उत्तर भारतातील महिलांचा पेहराव केला होता. तसेच सुरक्षा दलांची नजर चुकविण्यासाठी तिने तिच्या मुलांनाही अशाच प्रकारचे कपडे घातले होते. मानवी तस्करीतून भारत- नेपाळ सीमा ओलांडताना महिलांना विशेषत: घरगुती मोलकरणी वाटावे,
असेच कपडे घालण्याची ही पद्धत वापरली जाते. हे सर्व करण्यासाठी तिने स्थानिक व्यावसायिकांची मदत घेतली असावी, असं गुप्तचर सूत्रांचं म्हणणं असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकरणी मानवी तस्करीचाही पर्दाफाश झाला आहे. सीमा हैदर ही १३ मे २०२३ रोजी भारत-नेपाळ सीमेवरून भारतात आली असल्याचं सांगितलं जात आहे.