दिल्ली : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अयोध्येत राम मंदिर बांधण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाकूड येथे जाहीरसभेला संबोधित करताना शहा म्हणाले की, ४ महिन्यांत अयोध्येत भव्य राम मंदिर बांधले जाणार आहे.
पुढे शहा म्हणाले की, प्रत्येकाला राम मंदिर बांधायचे होते, परंतु कॉंग्रेस आणि त्याचे वकील कोर्टात त्यासमोर अडथळा निर्माण करीत राहिले. “सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल आला आहे. ४ महिन्यांतच अयोध्येत भगवान राम मंदिर तयार होईल.”
सभेला संबोधित करताना ते म्हणाले कि हि वीरांची भूमी आहे. इंग्रजांना देश सोडण्याचा इशारा याच भूमीने दिला. संथाल हुलच्या युद्धात इंग्रजांशी लढा देताना येथील आदिवासींनी बलिदान देऊन इंग्रजांना देशाबाहेर केले.
मीर जाफर यांच्या कृत्याचा त्यांनी पर्दाफाश केला आणि त्यांच्यासारखा कोणताही प्रतिनिधी पुन्हा निवडून येऊ नये असेहो ते म्हणाले. झारखंडमध्ये सक्तीने धर्मांतर करणे हा एक मोठा मुद्दा होता. भाजपचे सरकार आल्यानंतर रघुबर दास यांनी सक्तीने धर्मांतर बंद करून आदिवासींना न्याय देण्याचे काम केले आहे.