नगर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवून मुसंडी मारली आहे. जिल्ह्यात 325 पेक्षाही जास्त ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती विजय मिळवून ज्येष्ठ नेते शरद पवार व पक्षावर विश्वास टाकल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचे सर्वच पदाधिकारी यांनी चांगले काम केलेले आहे. कोविडच्या काळात केलेल्या कार्याची पावती जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीला दिल्याचे ते म्हणाले.