नगर, (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या स्वराज्याच्या माध्यमातून आदर्श जगासमोर ठेवला. त्यांनी रयतेच्या कल्याणासाठी आपले सर्व आयुष्य पणाला लावले. त्यामुळे आजप्रत्येक गोष्ट म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव पुढे येते.
तसेच स्त्री सन्मानाचा आदर्श समाजापुढे ठेवला, शेतकर्यांसाठी ते मदत करत राहीले, असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आपण फक्त जयंती व पुण्यतिथीच्या दिवशीच न ठेवता कायमपणे स्मरणात राहिले पाहिजे, असे प्रतिपादन माजी महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.
बागरोजा हडको मित्र मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य सजावट करण्यात आली होती. याप्रसंगी आमदार निलेश लंके, माजी महापौर रोहिणी शेंडगे, सुरेखा कदम, संजय शेंडगे, अनिल बोरुडे, श्याम नळकांडे, सचिन शिंदे,
शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, संतोष गेनप्पा, दत्ता जाधव, आशा निंबाळकर, अरुणा गोयल, अशोक दहिफळे, सुरेश क्षीरसागर, सुरेश तिवारी, गणेश पिस्का आदिंसह मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संजय शेंडगे म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या जन्मांपासून मृत्यूपर्यतचा प्रत्येक दिवस हा देशासाठी प्रेरणादायी आहे. ते उत्तम संघटक, प्रशासक होते. राष्ट्र परमवैभवाला नेण्यासाठी शिवराय अंगीकारणे गरजेचे आहे. अशी महान विभूती पुन्हा होणे नाही, अशा शब्दात गौरव केला.