मुंबई – भारतामध्ये वेळोवेळी अनेक बलवान आणि प्रसिद्ध व्यक्ती जन्माला आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मानवता जपण्यासाठी आणि देशात मराठा साम्राज्य निर्माण करण्यासाठी समर्पित केले.
नुकतंच 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपतींची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांना नमन करण्यासाठी लाखो शिवप्रेमी गडावर दाखल झाले होते.
दरम्यान, अश्यातच आता तमाम महाराष्ट्रातील शिवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कळवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत उंच अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण होणार आहे. 10 मार्च रोजी माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार असून,
युवराज संभाजीराजे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. तसेच, यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार, धनंजय पवार, अशोक पवार, घनश्याम पवार, हरिभाऊ वाघ, विनोद खैरनार, चंद्रकांत पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित असणार आहे.