कोल्हापूर – कोल्हापूरातील कणेरी मठ येथे धक्कादायक घटना घडली आहे. कणेरी मठातील तब्बल 50 गायी अन्नातून विषबाधा झाल्यामुळे दगावल्या आहे.
दरम्यान, कणेरी मठ येथे सिद्धगिरी संस्थानच्या वतीने सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवांतर्गत उभारण्यात आले होते, विविध दालनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली होती. तसेच या लोकोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. याठिकाणी जनावरांचे प्रदर्शन सुरू आहे त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात जनावरांना आणण्यात येत आहे. या घटनेत आतापर्यंत बारा गायींचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. पठान यांनी दिली आहे.