छत्रपती संभाजीनगर – २६ नोव्हेंबर पासून राज्यभरात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसानीचे पंचनामे जलद गतीने पूर्ण करुन शेतकऱ्यांना तातडीने प्रति हेक्टर ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या (Thackeray group) वतीने राज्य शासनाकडे करण्यात आली. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas danave) यांनी यांसदर्भात विभागीय आयुक्त संभाजीनगर (Sambhajinagar) यांना निवेदन दिले. तत्पूर्वी त्यांनी मराठवाड्यासह बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी मुळे झालेल्या नुकसान भागाची पाहणी केली. व शेतकऱ्यांशी संवाद साधला. (50 thousand per hectare to farmers)
यावेळी त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला. ते म्हणाले की, गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. पिकांचे, फळांचे नुकसान झाले आहे. पण शेडनेट, पाईपलाईनचे देखील नुकसान झालेले आहे.”
पिकांना मदत शासनाकडून दिला जाईल. पण शेडनेट, पाईललाईनचे नुकसानीचे मदत कशी मिळणार? शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शासनकडे पाठपुरावा करू, असे देखील दानवे म्हणाले.
राज्यातील शेतकरी गारपीट आणि अवकाळी पावसाने हाताशी आलेले पीक गमावून बसला आहे. अश्या परिस्थितीत राज्याचे राज्यकर्ते अन्य राज्यात दुसऱ्या पक्षांच्या प्रचारासाठी हिंडतात. या सरकारला शेतकरी आणि त्याच्या पिकांशी काही देणे-घेणे नाही, हा माझा स्पष्ट आरोप आहे अशा भावना दानवे यांनी आपल्या अधिकृत एक्सवरून देखील व्यक्त केल्या आहेत.