मुजफ्फरपुर – भाजपचे फायर ब्रॅन्ड नेता आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचे संकेत दिले आहेत. माझा राजकीय प्रवास लवकरच संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत हा प्रवास माझा शेवटचा असणार आहे.
गिरीराज सिंह म्हणाले कि, आमदार किंवा खासदार बनण्यासाठी मी राजकारणात आलो नव्हतो. कलम ३७० रद्द करणे हे माझे राजकीय उद्दिष्ट होते. माझे अर्धे काम मोदींनी पूर्ण केले आहे. जहां बलिदान हुए मुखर्जी, वो कश्मीर हमारा है, हा अजेंडा आमचा नेहमीच राहिला आहे. पंतप्रधान मोदींनी देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी पावले उचलली आहेत. लोकसंख्या नियंत्रण हे माझे आणखी एक उद्दिष्ट आहे. आणि यावरही पंतप्रधान मोदींनी १५ ऑगस्टच्या भाषणादरम्यान चिंता व्यक्त केली आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, गिरीराज सिंह हे विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी विशेष ओळखले जातात. २०१९च्या लोकसभेच्या निवडणुका जिंकून ते संसदेत पोहोचले. ते केंद्रातील एनडीए सरकारमध्ये पशुसंवर्धन राज्यमंत्री आहेत. याआधी ते बिहारमध्ये कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत. सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतल्याचे गिरीराज सिंग यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.