मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या ठाण्यातील ‘उत्तर सभे’ची उत्सुकता सर्वांना होती. त्यानुसार राज ठाकरे यांनी आज सभा घेतली. या सभेत त्यांनी चौफेर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दोन मागण्या केल्या.
राज्यातील महाविकास आघाडीवर टीका करताना राज ठाकरे यांनी काश्मीरमधील ३७० कलम हटविल्याबद्दल मोदींचं कौतुक केलं. तसेच कलम हटविल्यानंतर सर्वात आधी ट्विट मी केलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान नरेंद्र मोदी यांच्यावर मी टीका केली होती. गरज पडली तर पुन्हा करेन, असं ठणकावून सांगताना राज ठाकरे यांनी मोदींकडे दोन मागण्या केल्या. यामध्ये देशात समान नागरिक कायदा आणण्याची मागणी पहिली असून देशातील वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी काही तरी करावं असही राज ठाकरे यांनी म्हटलं.