नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. त्यांनी आज अनलॉक २ ची घोषणा केली तसेच अनेक महत्वाचा घोषणा देखील केल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले, आमच्या सरकारने अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत अडीच पटीने अधिक धान्य दिले आहे, ब्रिटनच्या लोकसंख्येपेक्षा १२ पट जास्त आणि युरोपियन संघटनेच्या लोकसंख्येच्या दुप्पटपेक्षा अधिक धान्य दिले आहे.
ते म्हणाले, आणखी एक महान गोष्ट आहे ज्याने जगाला आश्चर्यचकित केले आहे. म्हणजेच कोरोनाशी लढा देताना भारतातील ८० कोटीहून अधिक लोकांना पंतप्रधान गरीब अन्न कल्याण योजनेअंतर्गत तीन महिन्यांचे रेशन देण्यात आले होते, म्हणजेच कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी पाच किलो गहू किंवा तांदूळ मोफत देण्यात आले. ही योजना नोव्हेंबर महिन्यापर्यंत वाढविण्यात आली आहे.
पावसाळ्याच्या काळात आणि नंतर मुख्यतः कृषी क्षेत्रात आपल्याकडे अधिक काम आहे. इतर क्षेत्रात थोडीशी मंदी आहे. हळूहळू जुलैपासून सण देखील सुरु होण्यास सुरवात होते. या उत्सवांच्या वेळी गरजा वाढतात, खर्चही होतो. या सर्व बाबी लक्षात घेत आता ठरविण्यात आले आहे की प्रधानमंत्री गरीब कल्याण अण्णा योजना आता दिवाळी आणि छठ पूजा पर्यंत म्हणजे नोव्हेंबरच्या अखेरीस वाढविण्यात येईल, अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली.