– कापूरहोळ वार्ताहर
पुणे – सातारा महामार्गावर वरवे गावाच्या हद्दीत विचित्र अपघात झाल्याची घटना घडली असून 4 वाहन एकमेकांना धडकल्यानं हा अपघात झाला असून मृतात एका नऊ वर्षीय मुलीचा समावेश आहे. वाहनांमध्ये 2 कंटेनर आणि 2 बसचा समावेशय आहे यात खाजगी बस पलटी झाल्यानं, 4 जणांचा मृत्यू तर ३५ जण जखमी झाले यातील 4 जण गंभी असून जखमींवर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत जवळपास ३५ जण जखमी असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ऋतुजा रवींद्र चव्हाण (वय ९ रा. खडकमाळ, उत्तमनगर), आणि कंटेनर चालक शिवराजकुमार एच आर (रा. कर्नाटक) असे ठार झालेल्याचे नाव असून दोन मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पुणे – सातारा महामार्गावर वरवे गावाच्या हद्दीत अपघात झाल्याची घटना रविवारी (दि. ११) सकाळी आठ वाजण्याचा सुमारास घडली आहे.
कर्नाटक वरून आलेल्या श्रीकृष्ण लक्झरी बस क्र. के ऐ ५१ ए एफ ५७०७ बसने पुणे बाजूकडे जात असताना प्रवाशांना नाष्टया साठी सेवा रस्त्यावर उलट दिशेने यु-टर्न मारत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने एम एच ४६ ऐ के ६३०९ जोरदार धडक दिली धडक एवढी घांबिर होती की, लक्झरी बस महामार्गावर जागीच पलटी झाली. यात लक्झरी चालक जागीच ठार झाला. तर धडक दिलेला कंटेनर हा सातारा बाजूकडे जाणाऱ्या दिशेने महामार्गावर घुसला.
यावेळी पुणे बाजूकडून येणाऱ्या कंटेनर क्र. एम एच ०४ एच वाय ०२७९ ला धडकला व तो कंटेनर शेजारून जाणाऱ्या शिवशाही बस क्र. एम एच ०९ ई एम १३८० ला धडकला. व शिवशाही बस मधील नऊ वयाची मुलगी क्रुतुजा गंभीर जखमी होऊन मृत्यू पावली. सुनंदा रवींद्र चव्हाण (वय ४२ खडकमाळ, उत्तमनगर), रत्ना रवींद्र पुजारी (वय ३८), रवींद्र रामा पुजारी वय ४१ ( दोघेही रा. ठाणे मुंबई ),
विना प्रभाकर गौडा (वय ३४), ज्योती जयराम गौडा (वय ३९), पर्वतमा देवे गौडा (वय ४२), हेमा अण्णा गौडा (वय ३५), मीनाक्षी माय शेट्टी गौडा (वय ३५), संजू रवी गौडा (वय २४), प्रदीप नंजापा गौडा (वय २५, सर्व रा. कर्नाटक, सध्या रा. पुणे) अशी जखमीची नावे असून पैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
अपघाताची माहिती मिळताच राजगड पोलीस आणि महामार्ग पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत तीन क्रेनच्या साह्याने अपघातातील वाहने रस्त्यावरून बाजूला करत. तब्बल तीन तासांनी वाहतूक सुरळीत केली यावेळी महामार्गाच्या दुतर्फा वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. जखमीवर खाजगी व शासकीय रुग्णालयात पुढील उपचार चालू आहेत.
या ठिकाणी वारंवार होत असलेल्या अपघातामुळे स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून महामार्गावरील सेवा रस्ता व पुलाचे काम अर्थवट असल्याने हा अपघात झाला असून याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागिकांमधून होत आहे.