नवी दिल्ली – चालू आर्थिक वर्षात अन्नधान्यावर चार लाख कोटी रुपयाचे अनुदान दिले जाणार असल्याची माहिती केंद्रीय सचिव सुधांशू पांडे यांनी दिली.
गेल्या वर्षी बराच काळ लोकांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे गेल्या वर्षी 5.29 लाख कोटी रुपयांचे अनुदान अन्नधान्यावर द्यावे लागले होते. यावर्षी 2.25 लाख कोटी रुपयांचे अनुदान राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत धान्य खरेदी करून वितरित करण्यासाठी वापरले जाणार आहे.
तर 1.47 लाख कोटी रुपयांचे अनुदान प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत लागणार आहे. गेल्या वर्षी मध्यम वर्गीय आणि गरिबांच्या उत्पन्नावर दीर्घकाळ प्रचंड परिणाम झाला होता. त्यामुळे यातील बऱ्याच लोकांना मोफत अन्नधान्यावर जास्त अनुदान द्यावे लागले होते असे त्यांनी सांगितले.