हिंगोली – जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे (Dr. Santosh Tarfe) व शेतकरी नेते म्हनून ओळखले जाणारे अजित मगर यांनी आज मातोश्रीवर पक्ष प्रमूख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले.
राज्यात मोठी राजकीय उलथा पालथ झाली आणि शिंदे गटाने भाजपासोबत सत्ता स्थापन केली. शिवसेनेसाठी ढसा ढसा रडणारे संतोष बांगर हे देखिल शिंदे गटात सामील झाले. त्यापाठोपाठ खासदार हेमंत पाटील देखिल शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे हिंगोली मध्ये शिवसेनेला खिंडार पडली होती. मात्र हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिकांनी पक्ष प्रमूख उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे जाऊन भेट घेतली व शिवसैनिक तुमच्या सोबत आहेत, असा विश्वास ठाकरे यांना दिला.
कॉंग्रेसचे माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे अनेक दिवसापासून पक्षावर नाराज होते. ते कॉग्रेस पक्ष सोडणार यांची चर्चा चालु होती व आज त्यांनी मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. त्यांच्याबोतच वंचित बहुजनचे अजित मगर यांनी देखिल आज शिवबंधन बांधले आहे.
शिवसेनेचे नांदेड- हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी आपल्या वेगळ्या शैलीच्या राजकारणामुळे विरोधकांना चांगलेच हैराण करून सोडले आहे. शिवसेनेचे अभ्यासू आणि आक्रमक संपर्कप्रमुख म्हणून बबनराव थोरात यांची ओळख आहे. हिंगोलीमध्ये पुन्हा राजकीय भूकंप घडवत कळमनुरी मतदार संघाचे माजी आमदार काँग्रेसचे नेते संतोष टारफे आणि मात्तबर शेतकरी नेते अजित मगर व हिंगोली जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात चांगली ओळख असलेले माधव पुरी यांचा प्रवेश पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत करून घेतला. बबनराव थोरात यांच्या या मास्टर स्ट्रोकमुळे हिंगोली जिल्ह्याचे राजकारण बदलणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील बंडखोर खासदार हेमंत पाटील आणि आमदार संतोष बांगर यांनी शिंदे गटात सामील झाल्यानंतर शिवसेनेची स्थिती डळमळीत झाली होती. मात्र बबनराव थोरात यांना नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याची जबाबदारी मिळताच शिवसेनेची पुनर्बांधणी करत माजी खासदार सुभाष वानखेडे आणि विनायकराव भिसे पाटील यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेऊन शिवसेनेला बळकटी आणली. आणि आता माजी आमदार संतोष टारफे, शेतकरी नेते अजीत मगर व शैक्षणिक क्षेत्रातील माधव पुरी यांच्या प्रवेशाने शिवसेनेला अधिक बळ मिळणार आहे. (Former MLA Dr. Santosh Tarfe joined Shiv Sena)