Team India – पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट याने भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. बट याच्या मते, भारतातील संघात वेगवान गोलंदाजांना जास्त संधी दिली जात नाही, केवळ १३० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना व्यवस्थापनाकडून वारंवार पाठिंबा दिला जातो. याच कारणामुळे संघाच्या गोलंदाजीत सुधारणा होण्यास मदत होत नाही, असे बट याने मत व्यक्त केलंय.
#VijayHazareTrophy | महाराष्ट्राचा ऋतुराज गरजला…! ‘अशी’ कामगिरी करणारा जगातील एकमेव खेळाडू
भारतीय संघातील ( Team India ) वेगवान गोलंदाजांची अलीकडील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. संघाचे वेगवान गोलंदाज बऱ्याच वेळी कमकुवत दिसले आहेत. याचे उदाहरण आपण टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाहिले, जिथे इंग्लंडने बिनबाद १७० धावा करून भारताला मत दिली. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यामध्ये टॉम लॅथम आणि केन विल्यमसन यांनी मोठी भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यातही गोलंदाजांना त्यांना बाद करता आले नाही.
#VijayHazareTrophy | महाराष्ट्राचा ऋतुराज गरजला…! ‘अशी’ कामगिरी करणारा जगातील एकमेव खेळाडू
सलमान बट याने आपल्या युट्युब चॅनेलवर बोलताना म्हटले की, “भारतीय संघाने ( Team India ) वेगवान गोलंदाजांबाबत गंभीरतेने विचार करणे गरजेचे आहे. भारताला आपल्या वेगवान गोलंदाजांना तयार करायचे आहे की, त्यांना फक्त मध्यमगती गोलंदाजांना चिकटून बसायचे आहे. या गोष्टीचा गंभीरपणे विचार करावा लागेल. वेगवान गोलंदाजांना तुम्ही संधी का देत नाही आणि त्यांना अनुभव का घेऊ देत नाहीत? जेव्हा तुम्ही १३० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांसोबत खेळत असता तेव्हा संघ मजबूत दिसत नाही.”
“टीम इंडियाच्या ( Team India ) गोलंदाजांमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांवर वर्चस्व निर्माण होईल असे काहीही नाही. उमरान मलिकने पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाजी केली. त्याने आपल्या वेगामुळे काही धावा खर्च केल्या,पण गडीही बाद केले. शेवटच्या दोन-तीन षटके सोडली तर तो इतरांसारखा जास्त महागडा नव्हता. त्याचबरोबर चांगल्या फलंदाजीच्या खेळपट्टीवर संघाची गोलंदाजी खूपचकमकुवत दिसते”, असेही बट याने म्हटले आहे.