Akash Chopra – भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंड दौऱ्यातून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे या दौऱ्यासाठी टी-२० संघाची जबादारी हार्दिक पंड्या तर वनडे संघाची जबाबदारी शिखर धवनकडे देण्यात आली. दरम्यान, माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने ( Akash Chopra ) रोहितच्या विश्रांतीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पुढच्या वनडे विश्वचषकासाठी फारसा वेळ उरलेला नाही, त्यामुळेच आता संघात जास्त प्रयोग करू नयेत, असे चोप्राने म्हटले आहे. रोहित शर्माला कर्णधार म्हणून सर्व सामने खेळावे लागतील. जर रोहित शर्माला ब्रेक घ्यायचा असेल तर त्याने आयपीएलमध्ये खेळू नये, असा सल्लाही त्याने चोप्राने दिला आहे.
“कोहलीचा फोटो मी माझ्या ट्रॉफी रूममध्ये ठेवीन अन् रोज बघेन” सूर्यकुमार यादवचं भाष्य!
मागील काही वर्षांमध्ये भारताला आयसीसीच्या स्पर्धांमध्ये मोठे अपयश पचवावे लागले आहे. २०१३ पासून टीम इंडिया आयसीसी ट्रॉफीची वाट पाहत आहे. २०११ साली भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वात वनडे विश्वचषक जिंकला होता. गेल्या टी-२० विश्वचषकात संघ पहिल्याच फेरीतुन बाहेर पडला होता, तर यावेळीही भारताला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाच्या पराभवाचे मुख्य कारण खेळाडू थकल्याचे अनेकदा सांगण्यात आले आहे.
“कोहलीचा फोटो मी माझ्या ट्रॉफी रूममध्ये ठेवीन अन् रोज बघेन” सूर्यकुमार यादवचं भाष्य!
रोहितला विश्रांती घ्यायची असेल तर आयपीएल स्पर्धेतून घ्यावी
वर्कलोड मॅनेज करण्यासाठी वरिष्ठ खेळाडूंना अनेकदा विश्रांती दिली जात आहे. मात्र आकाश चोप्राच्या ( Akash Chopra ) मते, संघातील प्रमुख खेळाडूंनी विश्रांती घेणे हा योग्य निर्णय नाही. चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हटले की, “माझ्या मते वनडे संघातील प्रयोगाची वेळ संपली आहे. त्यामुळे आमचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माने किमान विश्रांती घ्यावी. रोहितला ब्रेक घ्यायचा असेल तर आयपीएलमधून घ्यावी. याआधी रोहित शर्माच्या बालपणीच्या प्रशिक्षकानेही म्हटले होते की, ‘जर खेळाडूंना कामाचा ताण जास्त होतोय असे वाटत असेल तर त्यांनी आयपीएल स्पर्धेत खेळू नये. विश्वचषक जिंकायचा असेल तर आयपीएलच्या स्पर्धेदरम्यान विश्रांती घ्या.’