कोल्हापूर – केंद्रातील भाजप सरकारने जम्मू-काश्मीरमधील ‘कलम 370’ आणि ’35-अ’ हटवून एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. काँग्रेसने 70 वर्षांपूर्वी केलेले पाप मोदी सरकारने धुवून काढले आहे.
त्यामुळे भाजप कोल्हापूरच्या वतीने केंद्र सरकारचे अभिनंदन करत जोरदार घोषणाबाजी जल्लोष केला. कलम 370 हटवल्या बद्दल पंतप्रधान मोदींच कौतुक करत कोल्हापूरच्या बिंदू चौकात साखर वाटप करत जल्लोष केला.